- थोडक्यात कोण काय म्हणाले, कर्नाटक निकाल ;
- काँग्रेस पक्ष कर्नाटकात गरिबांच्या बाजूने उभा राहिला. गरिबांच्या मुद्द्यावरच आम्ही लढलो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण द्वेष किंवा चुकीचे शब्द वापरून ही लढाई लढलो नाही.- राहुल गांधी
- आम्ही सामूहिक नेतृत्वातून ही निवडणूक जिंकलो आहोत, असं मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटलं आहे.
- फोडाफोडी आणि खोक्यांचं राजकारण लोकांना पसंत नाही हे कर्नाटक निवडणुकांच्या निकालातून दिसत आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
- लोक भाजपला वैतागले होते. त्यामुळे लिंगायत, वोक्कलिंग आणि इतर सर्व जातीच्या लोकांनी काँग्रेसला मतदान केलं आहे, असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.
- मोदींनी प्रचार करूनही फारसा फरक पडला नाही - सिद्धरामय्या
- पंतप्रधानांपासून तमाम नेत्यांनी प्रयत्न केले, तरीही आम्ही कमी पडलो – बसवराज बोम्मई
कर्नाटक निकालाबाबत कोण काय म्हणाले थोडक्यात...
मे १३, २०२३