💁♀️ 'माझी कन्या भाग्यश्री' योजना २०२१' नवीन अटी व नियम जाणून घ्या...
💁♂ योजनेचा उद्देश: 'सुकन्या' योजनेचा समावेश नव्याने सुरु करण्यात आलेल्या 'माझी कन्या भाग्यश्री' या योजनेत करण्यात आल्यामुळे 'सुकन्या' योजनेच्या सर्व अटी व शर्ती 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेमध्ये लागू करण्यात आले.
१) लिंग निवडीस प्रतिबंध करणे
२) बालिकेचा जन्मदर वाढविणे
३) मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे
४) बालिकेचा समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहनाकरिता समाजात समाजात कायमस्वरूपी सामुहिक चळवळ निर्माण करणे
५) मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे असे या योजनेचे उद्देश आहेत.
🧍♀️ 'माझी कन्या भाग्यश्री' या योजनेमध्ये लाभार्थीचे दोन प्रकार करण्यात आले आहेत.
१) एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे.
२) दोन्ही मुली आहेत आणि मातेने दुस-या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे.
🧐 योजनेच्या प्रमुख अटी :
▪️मुलीच्या वडिलांनी महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक
▪️कुटुंबातील एक मुलगी अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल
▪️कुटुंबात एक मुलगी असेल, तर पहिल्या मुलीच्या जन्मानंतर आई वडिलांनी १ वर्षाच्या आत नसबंदी करणे आवश्यक
▪️कुटुंबात दोन मुली असतील आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आईने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक
▪️एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास या योजनेचे लाभ मिळणार नाहीत.
▪️सदर योजनेचा लाभ ऑगस्ट २०१७ व त्यानंतर जन्मलेल्या मुलींना घेता येईल.
▪️ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. ७.५ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबास मिळणार आहे.
💰 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप :
■ सुरुवातीला प्रधानमांत्री जनधन योजनेअंतर्गत आई व मुलीच्या नावे संयुक्त खाते (Joint Account) उघडण्यात येईल. यामध्ये ५००० रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट आणि १ लाख रुपये अपघात विमा या सुविधा मिळतील.
🔅शासनामार्फत मुलीच्या नावे बँकेत रु. ५०,००० मुदत ठेव स्वरूपात ठेवण्यात येतील. (दोन मुली असतील तर प्रत्येकी रु. २५०००)
🔅जमा झालेली व्याजाची रक्कम मुलगी ६ वर्षांची झाल्यावर काढता येईल. त्यांनतर पुन्हा मुलगी १२ वर्षांची झाल्यांनतर काढता येईल. अधे मध्ये ही रक्कम काढता येणार नाही.
🔅मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला योजनेची संपूर्ण रक्कम काढता येईल. (मुलगी दहावी उत्तीर्ण व अविवाहित असावी)
🔅या योजनेचा लाभ बालगृहातील अनाथ मुलींना तसेच दत्तक मुलींनाही घेता येईल.
🔅दुर्दैवाने मुदतीपूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्यास योजनेची रक्कम पालकांना देण्यात येईल.
📑 आवश्यक कागदपत्रे :
✔️ आधार कार्ड
✔️ बँक खात्याचे पासबुक
✔️ उत्पन्नाचा दाखल
✔️ रहिवासी दाखल
✔️ मुलीचा जन्मदाखला
✔️ पासपोर्ट साइज फोटो
🤝 अर्ज करण्याची पध्दत : सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.
🏣 *संपर्क* : या योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग तसेच तालुकास्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
📍 *टिप* : सदरील योजनेचे नियम वा अटी वा इतर तरतुदी यांमध्ये बहुतांशी बदल असू शकतात. या कारणास्तव वाचकांनी संबंधित विभागास भेट देऊन खात्री करून घ्यावी.