मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून हटवण्याचे आदेश दिले होते. रश्मी शुक्ला यांच्यानंतर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज दुपारपर्यंत निवडणूक आयोगाकडे तीन नावे देणं अपेक्षित होतं. रश्मी शुक्ला यांच्यानंतर विवेक फणसाळकर यांची प्रभारी म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्याच्या पोलीस महासंचालकरदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे अधिकारी असून ते आता पोलिस महासंचालक (तांत्रिक व विधी) या पदावर कार्यरत होते.विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षाने रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप करत निवडणुक होण्याआधी त्यांना पदावरून हटवण्यात अशी मागणी विरोधी पक्षाने लावून धरली होती. काँग्रेस पक्षाने वारंवार मागणी केली होती, अखेर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना हटवत त्यांच्या जागी संजय वर्मा यांची निवड केली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकार असताना त्यांची यासदंर्भात चौकशीसुद्धा केली गेली होती. मात्र राज्यात सत्तांतर झाले आणि चौकशी थांबली अन् रश्मी शुक्ला यांची थेट पोलीस महासंचालकपदी निवड झाली. त्यावेळीसुद्धा सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केली होती.दरम्यान, महाराष्ट्राआधी झारखंडमध्येही निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पोलीस महासचिवांची बदली करण्यात आली होती. त्यावेळी अनुराग गुप्ता यांना पदावरून हटवत त्या पदावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रभार सोपवला होता. राज्यात आचार संहिता लागू झाल्यावर २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये ३०० पेक्षा जास्त पोलीस निरीक्षक तर जे २८ अधिकारी होते त्यामधील १५ अधिकारी हे मुंबईमधीलच होते ज्यांची बदली करण्यात आली होती. याबदल्यांवेळी रश्मी शुक्ला यांचीस बदली करण्यात आली नव्हती. त्यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. अखेर रश्मी शुक्ला यांची बदली झाली असून संजय वर्मा हे राज्याचे पोलीस महासंचाक असून ते २०२८ पर्यंत पदभार पाहणार असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे.
मोठी बातमी! रश्मी शुक्लांना हटवल्यावर संजय वर्मा राज्याच्या पोलिसांचे नवीन बॉस
नोव्हेंबर ०५, २०२४
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून हटवण्याचे आदेश दिले होते. रश्मी शुक्ला यांच्यानंतर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज दुपारपर्यंत निवडणूक आयोगाकडे तीन नावे देणं अपेक्षित होतं. रश्मी शुक्ला यांच्यानंतर विवेक फणसाळकर यांची प्रभारी म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्याच्या पोलीस महासंचालकरदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे अधिकारी असून ते आता पोलिस महासंचालक (तांत्रिक व विधी) या पदावर कार्यरत होते.विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षाने रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप करत निवडणुक होण्याआधी त्यांना पदावरून हटवण्यात अशी मागणी विरोधी पक्षाने लावून धरली होती. काँग्रेस पक्षाने वारंवार मागणी केली होती, अखेर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना हटवत त्यांच्या जागी संजय वर्मा यांची निवड केली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकार असताना त्यांची यासदंर्भात चौकशीसुद्धा केली गेली होती. मात्र राज्यात सत्तांतर झाले आणि चौकशी थांबली अन् रश्मी शुक्ला यांची थेट पोलीस महासंचालकपदी निवड झाली. त्यावेळीसुद्धा सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केली होती.दरम्यान, महाराष्ट्राआधी झारखंडमध्येही निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पोलीस महासचिवांची बदली करण्यात आली होती. त्यावेळी अनुराग गुप्ता यांना पदावरून हटवत त्या पदावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रभार सोपवला होता. राज्यात आचार संहिता लागू झाल्यावर २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये ३०० पेक्षा जास्त पोलीस निरीक्षक तर जे २८ अधिकारी होते त्यामधील १५ अधिकारी हे मुंबईमधीलच होते ज्यांची बदली करण्यात आली होती. याबदल्यांवेळी रश्मी शुक्ला यांचीस बदली करण्यात आली नव्हती. त्यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. अखेर रश्मी शुक्ला यांची बदली झाली असून संजय वर्मा हे राज्याचे पोलीस महासंचाक असून ते २०२८ पर्यंत पदभार पाहणार असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे.
Tags