ऑस्ट्रेलियापुढे भारतीयांचा कस ; मानधना, हरमनप्रीतकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा
● भारतीय संघाला महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या मोहिमेला पुन्हा रुळावर आणायचे असल्यास शनिवारी बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या लढतीत सर्वच विभागांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.
● न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक स्पर्धेपूर्वी झालेल्या मालिकेत भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या खात्यावर दोन विजय आणि दोन पराभव आहेत. या सामन्यांत फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळाले नाही.
● भारताला अजून तीन लीग सामने खेळायचे आहेत आणि आघाडीच्या चार संघांत स्थान मिळवायचे झाल्यास संघाला कामगिरी उंचवावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चारही सामने जिंकले आहेत.