भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माला यावर्षी खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला अर्जुन पुरस्कार मिळाला होता. पण हे दोघेही या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्याचबरोबर तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या खेळाडूंना आता करोना झाल्याचेही समोर आले आहे.