चालू घडामोडी आणि दिनविशेष - 4 नोव्हेंबर 2023
Type Here to Get Search Results !

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 4 नोव्हेंबर 2023

Top Post Ad

 

आयपीएलच्या लिलावाची तारीख जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे खेळाडूंवर लावली जाणार बोली?

  • इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामाचा (आयपीएल २०२४) लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयपीएलचा लिलाव भारताबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ असेल. ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, सर्व १० फ्रँचायझींना पाठवलेल्या संदेशात बीसीसीआयने असेही सांगितले की, कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अंतिम २६ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.
  • आगामी हंगाम हे खेळाडूंसाठी तीन वर्षांच्या कराराचे तिसरे आणि अंतिम वर्ष असेल. पुढील वर्षी मेगा लिलाव होणार आहे. बीसीसीआयने गेल्या वर्षीचा लिलाव इस्तंबूलमध्ये आयोजित करण्याचा विचार केला होता, परंतु हा विचार मागे घेतला होता. आयपीएलने शुक्रवारी जाहीर केले की २०२३ च्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स सोबत असलेल्या वेस्ट इंडिजचा खेळाडू रोमॅरियो शेफर्डचा पुढील हंगामासाठी मुंबई इंडियन्सोबत व्यवहार (ट्रेड) करण्यात आला आहे.
  • ज्या दिवशी लिलाव होईल, त्या दिवशी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दुसरा वनडे खेळण्यात व्यस्त असेल. आयपीएल संघांना कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी २६ नोव्हेंबरपर्यंत वेळ असेल. सर्व १० आयपीएल संघांच्या पर्समध्ये १०० कोटी रुपये असतील, जे गेल्या हंगामापेक्षा ५ कोटी रुपये जास्त आहेत.
भारत-पाकिस्तान सेमीफायनल होणार? एका सामन्यात चित्र होईल स्पष्ट; वाचा काय आहे गणित!
  • यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार भारत मानला जात आहे. आत्तापर्यंत टीम इंडिया यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अपराजित राहिली आहे. ७ पैकी ७ सामने जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत १४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. श्रीलंकेचा ३००हून अधिक धावांनी पराभव करत भारतीय संघानं दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिका संघाचाही सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. गुणतालिकेनुसार दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी राहण्याची शक्यता आहे. मात्र, उरलेल्या दोन जागांसाठी चुरस वाढली असून योग्य समीकरणं जुळली, तर भारत व पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.

गुणतालिकेत सध्या कोण कितव्या स्थानी?

  • ३ नोव्हेंबर रोजी दुपारपर्यंत गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघांचे दोन सामने शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या (८ गुण/३ सामने) तर न्यूझीलंड चौथ्या (८ गुण/२ सामने) स्थानी आहे. सेमी फायनलसाठी तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी या दोन संघांना सर्वाधिक संधी आहे. मात्र, पुढच्या संघांचे उर्वरित सामने आणि नेट रनरेट यामुळे चुरस निर्माण होऊ शकते.
  • सध्या पाचव्या स्थानी पाकिस्तान (६ गुण/२ सामने) आहे. पाकिस्तानचे पुढचे सामने अनुक्रमे न्यूझीलंड व इंग्लंडशी होणार आहेत. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला आपलं स्थान निश्चित करायचं असेल, तर उर्वरीत दोन्ही सामने जिंकावे लागतील. पण भारत-पाकिस्तान सेमीफायनल होण्यासाठी एवढं पुरेसं आहे?

कोणता ‘आकडे’योग जुळून यावा लागेल?

  • भारत-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये आमने-सामने पाहायचे असतील, तर पाकिस्तानला फक्त दोन्ही सामने जिंकून फायदा नसून न्यूझीलंडविरुद्धचा सामना त्यांना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. आधी बॅटिंग केल्यास ८५ धावांनी किंवा धावांचा पाठलाग केल्यास १५ षटकं शिल्लक ठेवून, अर्थात ३५ षटकांमध्ये लक्ष्य पूर्ण करून पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवावा लागेल. असं झाल्यास, न्यूझीलंडनं त्यांच्या शेवटच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला, तरी पाकिस्तान व न्यूझीलंडचे गुण सारखे होतील, पण नेट रनरेटच्या जोरावर पाकिस्तान न्यूझीलंडच्या वर जाईल.
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंची पहिली मागणी पूर्ण
  • राज्य सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतलं आहे. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्य सरकारने मनोज जरांगे यांची पहिली मागणी पूर्ण केली आहे. या बाबतचा जीआर शुक्रवारी (३ नोव्हेंबर) मंजूर करण्यात आला. संबंधित जीआर संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मनोज जरांगे यांच्याकडे दिला जाणार आहे. त्यासाठी संबंधित नेते थोड्याच वेळात गॅलक्सी रुग्णालयात येणार आहेत.
  • याबाबतची अधिक माहिती देताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबत कालही वृत्तवाहिन्यांवर बातम्या आल्या होत्या. त्यांना उलटी आणि इतर त्रास झाल्याचं समजलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मनोज जरांगेंशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. परवा दिवशी (२ ऑक्टोबर) मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं. त्यानंतर काल पहिला दिवस होता. उपोषण सुटल्यानंतर अवघ्या २४ तासांत मनोज जरांगेंची पहिली मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे.”
  • “न्यायमूर्ती शिंदे समितीची कार्यकक्षा किंवा व्याप्ती वाढवावी, अशी पहिली मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. ती मागणी राज्य सरकारने शुक्रवारी रात्री पूर्ण केली आहे. त्याचा जीआर संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे त्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांना देणार आहोत. पुढच्या काही वेळात संदीपान भुमरे आणि अतुल सावे रुग्णालयात येणार आहेत. हे सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची आणि विभागीय आयुक्तांची बैठक घेतली. कुणबी नोंदी शोधून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची तत्काळ कारवाई सुरू करा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत,” अशी माहिती मंगेश चिवटे यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
जगभरातील रामभक्तांसाठी ट्रस्टकडून महत्त्वाचं आवाहन, सांगितली मंदिराची १२ वैशिष्ट्यं! जाणून घ्या सविस्तर

राम मंदिराचे वैशिष्ट्यं काय आहेत?

  • पारंपारिक नगर शैलीत मंदिर बांधलेले आहे.
  • मंदिराची लांबी (पूर्व-पश्चिम) ३८० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे
  • तीन मजली मंदिर, प्रत्येक मजल्याची उंची २० फूट, एकूण ३९२ खांब, ४४ दरवाजे.
  • तळमजला गर्भगृह – भगवान श्री रामाच्या बालस्वरूपाचे देवता (श्री रामलला), पहिल्या मजल्यावरील गर्भगृह श्री राम दरबार.
  • एकूण पाच मंडप – नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप, कीर्तन मंडप.
  • खांब आणि भिंतींमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती.
  • पूर्वेकडून ३२ पायऱ्या (उंची १६.५ फूट) चढून सिंहद्वार येथून प्रवेश मिळेल.
  • अपंग लोक आणि वृद्ध लोकांसाठी रॅम्प आणि लिफ्टची तरतूद.
  • चौफेर एक आयताकृती उद्यान (आकार) – लांबी ७३२ मीटर, रुंदी ४.२५ मीटर, उद्यानाच्या चार कोपऱ्यांवर चार मंदिरे, उद्यानाच्या दक्षिणेला भगवान सूर्य, शंकर, गणपती, देवी भगवती, हनुमान आणि अन्नपूर्णाचे मंदिर उत्तरेकडे माता.
  • मंदिराच्या दक्षिणेकडील ५ पौराणिक सीताकूप
  • परकोटाच्या बाहेर दक्षिण दिशेला महर्षि वाल्मिकी, महर्षि वशिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांचे प्रस्तावित मंदिर.
  • ओम दक्षिण-पश्चिम भागात नवरत्न कुबेर माळावर वसलेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार आणि रामभक्त जटायू राज यांच्या मूर्तीची स्थापना.

४ नोव्हेंबर महत्वाच्या घटना


१८९६: पुण्यात डेक्कन सभेची स्थापना.
१९१८: पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली.
१९२१: जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या.
१९२२: तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश.
१९४८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.
१९९६: कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा नाट्यगौरव पुरस्कार डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर
२०००: हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार जाहीर.
२००१: हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.
२००८: बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.

४ नोव्हेंबर जन्म


१६१८: मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १७०७)
१८४५: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा शिरढोण जि. कुलाबा, रायगड येथे जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १८८३)
१८७१: मानववंशशास्त्रज्ञ शरदचंद्र रॉय यांचा जन्म.
१८८४: प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९४२)
१८८४: ट्रॅक्टरचे निर्माते हॅरी फर्ग्युसन यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९६०)
१८९४: कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १९७१)
१८९७: भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्माल यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९८४)
१९१६: बार्बी बाहुलीच्या निर्मात्या रुथ हँडलर यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००२)
१९२५: चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक ऋत्विक घटक यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९७६)
१९२९: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७१)
१९२९: गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २०१३)
१९३०: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रंजीत रॉय चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर २०१५)
१९३४: दिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म.
१९३९: चालते बोलते गणिती यंत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतलादेवी यांचा जन्म.
१९५०: व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक निग पॉवेल यांचा जन्म.
१९५५: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अल्हाज मौलाना घोसी शाह यांचा जन्म.
१९७१: अभिनेत्री तब्बू यांचा जन्म.
१९८६: भारतीय उद्योजक सुहास गोपीनाथ यांचा जन्म.

४ नोव्हेंबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिका:  येथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९७०: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक पं. शंभू महाराज यांचे निधन.
१९९१: प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट यांचे निधन. (जन्म: १२ जून १८९४)
१९९२: मोटर-व्हीलचेअरचे निर्माते जॉर्ज क्लाईन यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९०४)
१९९५: इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते यित्झॅक राबिन यांचे निधन. (जन्म: १ मार्च १९२२)
१९९८: हिंदी कवी नागार्जुन यांचे निधन.
१९९९: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १९५८)
२००५: इतिहासकार, वृत्तपत्रकार,कोशकार स. मा. गर्गे यांचे पुणे येथे निधन झाले.
२०११: नाटककार व साहित्यिक दिलीप परदेशी यांचे निधन.

नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १४ नोव्हेंबर १८८९

NMK

दिनांक : १५ नोव्हेंबर २०००

NMK

दिनांक : १६ नोव्हेंबर १९४५

NMK

दिनांक : १८ नोव्हेंबर १९६२

NMK

दिनांक : ९ नोव्हेंबर २०००

NMK

दिनांक : ५ नोव्हेंबर १८७०

NMK

दिनांक : १ नोव्हेंबर १९५६

NMK

दिनांक : ७ नोव्हेंबर १८२४

NMK

दिनांक : ९ नोव्हेंबर २०००

NMK

दिनांक : १९ नोव्हेंबर २०१३

NMK

दिनांक : १९ नोव्हेंबर १९१७

NMK

दिनांक : २२ नोव्हेंबर १९६५

NMK

दिनांक : २६ नोव्हेंबर १९४९

Below Post Ad